या 2 राशींचे लग्न झाले तर जणू दुग्धशर्करा योगच…या राशीचे नवरा बायको खूपच भाग्यवान असतात !

नमस्कार मित्रांनो,

योग्य जोडीदाराची निवड करण्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात जसे की त्याचा आवडता छंद, आवडता रंग, गाणं बरंच काही आणि आपल्या आवडीच्या जोडीदाराची निवड करणं हे तर फारच कठीण काम आहे पण ज्योतिष शास्त्रामध्ये राशींच्या अशा काही जोड्या सांगण्यात आले आहेत ज्यांची लग्न झाली आणि इतर कुठलीही अडचण नसेल तर अशी लग्न दीर्घकाळ टिकू शकतात व ते एकमेकांचे उत्तम जीवन साथी होऊ शकतात.

त्यातली पहिली जोडी आहे तूळ आणि सिंह राशीची. सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव बराच सारखा असतो. हे दोघंही सामाजिक असतात. आणि लोकांना भेटणं हसणं बोलणं या दोघांचाही छंद असतो. त्यांना स्वतःला व्यक्त करायला आवडतं. त्यामुळेच या राशीचे लग्न असे लग्न दीर्घकाळ टिकू शकते. दुसरी जोडी आहे मेष आणि कुंभ राशीची, या दोन्ही राशीचे लोक एकमेकांचे जीवन साथी झाले तर ते उत्तम निर्णय घेऊ शकतात.

हे दोघेही प्रेम आणि रोमांच याने भरलेले असतात. बऱ्याच सारख्या अशा गोष्टी पसंत करतात. तसंच ही दोघंही सृजनात्मक असतात. स्वच्छंदता पसंत करतात आणि दोघे आपल्या जोडीदाराला योग्य स्पेस देणं पसंत करतात. यानंतरची योग्य जोडी असणार आहे मेष आणि कर्क राशी. मेष राशीचे लोक नेहमी बहादूर आणि निडर असतात आणि कर्क राशीचे लोक ऊर्जावान असतात. हे जोडीदाराला देखील ऊर्जावान ठेवतात त्यामुळे या दोघांची जोडी उत्तम जोडी मानले जाते. यानंतरची जोडी आहे ती आहे राशीचक्रातील पहिली रास आणि राशीचक्रातील शेवटची रास.

अर्थातच मेष आणि मीन राशीची जोडी. मेष आणि मीन राशीच्या लोकांच देखील आपापसात पटतं. प्रेमळ सं-बंध, एकमेकांसोबत हे दोघेही कर्तव्यनिष्ठ आणि एकनिष्ठ असतात. मेष रास अग्नितत्त्वाची रास असल्यामुळे अर्थातच स्वभावाने थोडी तापट असते परंतु त्यांचं लग्न जलतत्वाची मीन राशीच्या शांत स्वभावाच्या व्यक्‍ती झाल्यात असं लग्न दीर्घकाळ टिकू शकत. आपल्याकडे म्हणतातच ना संसारात एकाने आग झालं तर दुसऱ्याला पाणी बनावच लागतं हाच उद्देश मेष आणि मीन यांच्यामध्ये दिसून येतो.

यानंतरची जोडी आहे वृषभ आणि कर्क. हे दोघेही एकमेकांना समान आदर देतात. एकमेकांची प्रशंसा देखील करतात. वृषभ आणि कर्क यांच्यात उत्तम ताळमेळ नसतो. कर्क राशीचे लोक हे खऱ्या मनाचे असतात तर वृषभ राशीचे लोक हे दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमीच तत्पर असतात. दोघंही घराच महत्त्व जाणून असतात आणि मग उत्तम जोडीदारासाठी अजून काय हवं असतं. वृषभ राशीचा आणखीन एका राशी सोबत चांगलं पटतं आणि ते म्हणजे मकर रास होय.

हे दोघे लोकांसोबत प्रेम आणि सहयोगाने वागतात. वृषभ रास असणारे नेहमी मकर राशीच्या लोकांचा काम आणि प्रसन्नचित्त व्यवहाराची प्रशंसा करतात. मकर राशीचे लोक वृषभ राशीचा समजदारी ला पसंत करतात. त्यानंतर मेष आणि धनु यांची जोडी देखील सर्वोत्तम असते. धनु राशीचे लोक नेहमीच आपल्या मनाचच ऐकतात. कुठल्याही प्रकारचे नखरे आणि नाटक या पासून दूर असतात. हास्यविनोद करणे यांना पसंत असते. तसेच मेष राशीचे लोक काही सामाजिक दृष्ट्या सक्रिय असतात आणि वास्तवात जगणं त्यांना जास्त आवडतं.

यानंतरची जोडी आहे दोन्हीही जलतत्त्वाच्या राशींची. कर्क आणि मीन या दोन्ही जलतत्त्व राशी आहेत. ते त्यांच्या आत्मिक आणि आध्यात्मिक संबंधांना दर्शवतं. या दोन्ही राशीचे लोक फार भावूक आणि एकमेकांना दुःख होणार नाही याची नेहमी काळजी घेतात. स्पष्ट बोलणारे सिंह राशीचे लोक त्यांचं जास्त कुणाशी पटत असेल तर धनु राशीच्या लोकांशी. यांच चांगलं पटतं. सिंह राशीचे लोक थोडे तापट स्वभाव आणि जिद्दी असतात पण धनु राशीच्या लोकांना यांचा आत्मविश्‍वास फार आवडतो.

त्यामुळे हे दोघं प्रत्येक समस्येचे समाधान काढण्यात यशस्वी होतात. यानंतरची राशी म्हणजे कन्या आणि मकर राशी. कन्या राशीचे लोक काळजी करणारे असतात. ज्यामुळे त्यांचा स्वभाव अंतर्मुख होऊन जातो. पण कन्या राशीचे लोक जेव्हा बोलतात तेव्हा खूप मनमोकळी आणि त्यांचा हाच स्वभाव मकर राशीच्या लोकांना आकर्षित करतो. यानंतरची जोडी आहे सिंह आणि मिथुन राशीची.

सिंह राशीचे लोक मानसिकदृष्ट्या सशक्त जोडीदाराची निवड ठेवतात. तसेच मिथुन राशीचे लोक दुसऱ्यांना प्रेमाची जाणीव करून देण्याला प्राथमिकता देतात. त्यामुळे ही जोडी देखील फार छान संसार करते. कुंभ आणि मिथुन या राशीच्या जोडीकडे पाहता या दोन्ही शांत स्वभाव असणाऱ्या आहेत. या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढ-उतारात एकमेकांची साथ देतात. मिथुन राशि वाले लोक चांगल्या कल्पना यांची प्रशंसा करतात आणि कुंभ राशीचे जातक कलात्मक असतात.

मिथुन राशीच्या व्यक्तींचा आणखीन एका राशीशी पटतं आणि ते म्हणजे तुळ राशी. या दोन्ही रास एकमेकांवर पूर्ण अधिकार दाखवणार हीच गोष्ट दोघांमध्ये प्रेम वाढवण्यास मदत करते. या दोघांमधील नातं नेहमीच नवीन वाटतं. दोघही प्रत्येक समस्येवर शांततेने तोडगा काढतात. यानंतर जी जोडी येते ती म्हणजे वृश्चिक आणि वृषभ राशीचे लोक. हे लोक बऱ्याच बाबतीत एक सारखे असतात. दोघही जोश आणि आवेशपूर्ण असतात. आपापसातील सं-बंधांमध्ये दोघेही समान व्यवहार करू शकतात. वृश्चिक राशीच्या लोकांचे सर्वात उत्तम जोडीदार म्हणून वृषभ राशीचे लोक असतात.

यानंतर ची शेवटची जोडी आहे वृश्चिक आणि कर्क राशी. वृश्चिक आणि कर्क दोघेही जल तत्वाची रास म्हणून या दोन्ही राशीचे लोक एकमेकांना सहयोग पद्धतीने वागतात. या दोन्ही राशींचे लोकं संवेदनशील असतात आणि एकमेकांना समजून घेण्याचा चांगला प्रयत्न करतात. ज्योतिष शास्त्रानुसार राशीच्या काही जोड्या ज्यांची लग्न झाली तर दीर्घकाळ टिकू शकतात.

पण अर्थातच लग्न यशस्वी होण्यासाठी कुठलीही एकच गोष्ट कारणीभूत असू शकत नाही तर त्यासाठी दोघांमध्ये सामंजस्य आपुलकी आणि प्रेम असणे देखील गरजेचे आहे. त्याच बरोबर एकमेकांच्या कुटुंबांमध्ये सुद्धा एकमेकांबद्दल आदर हवा. आणि हे सगळं जुळून आलं तर मग अर्थातच सगळेच तुम्हाला म्हणतात तुम्ही एकमेकांसाठीच बनलेले आहात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *