नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात वाईट शक्तींचा वास आहे घरात अशांत वाटते मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा भरलेली आहे घरात लक्ष्मी टिकत नाही घरातील सदस्यांमध्ये जर वादविवाद होत असतील. तर 100 टक्के तुमच्या वर किंवा तुमच्या वास्तू वर कोणीतरी करणी बाधा काळी जादू केलेली आहे. या करणी बाधेचा आपल्या प्रगतीवर व आपल्या घरातील पैशावर खूप मोठा प्रभाव पडतो.
यामुळे आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही तसेच घरात नेहमी आजारपण वास करतं. तर या करणी बाधेचा प्रभाव नष्ट करायचा असेल तर हा अत्यंत सोपा उपाय नक्की करून पहा. चला तर जाणून घेऊ या हा उपाय कसा करायचा. या उपायासाठी आपल्या बेलाचे पान लागणार आहे. बेलाचे पान हे अत्यंत पवित्र मानलं जातं यात एक प्रकारची दैवीय शक्ती आहे. तुम्ही बेलाचे रोप सुद्धा तुमच्या घरामध्ये लावू शकता.
या झाडाचा प्रभाव एवढा आहे की ज्या ठिकाणी बेलाचे झाड असतं त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा प्रभाव पडत नाही. तर 1 बेलपत्र घ्यायच आहे आणि एका चौरस पांढऱ्या कागदावर हे बेलपत्र चिटकवायचे आहे. व एका आसनावर माडी घालून बसायचं हे आणि बेलपत्र चिटकवलेला जो कागद आहे हा कागद आपल्या डोळ्यांच्या सरळ रेषेत येईल अशा ठिकाणी लावायचे आहे नसेल तर भिंतीला हे कागद चिटकावून तुम्ही भिंतीकडे तोंड करून बसू शकत.
आता या बेलपत्राकडे पाहत आपल्याला 5 ते 10 मिनिट त्रातक करायचे आहे म्हणजे या बेलपत्राकडे 5 ते 10 मिनिट एकटक बघत राहायचं आहे. यावेळी आपण ॐ नमः शिवाय या मंत्राचा निरंतर जप करत राहायचं आहे. हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करू शकता. फक्त हा उपाय करण्यापूर्वी आपण स्वच्छ हात पाय धुतले पाहिजे.
या बेलाच्या पानामुळे तुमच्या वर व तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारची वाईट शक्तीचा प्रभाव पडणार नाही. आपण हा उपाय दररोज ही करू शकता. परंतु कमीतकमी जोपर्यंत आपल्या घरातील वातावरण सकारात्मक वाटत नाही तोपर्यंत तरी तुम्ही हा उपाय दररोज नक्की करा.
दुसरा उपाय आहे रुद्राक्षाचा पण आपण जो रुद्राक्ष वापरणार आहोत हे ओरिजनल असावा बाजार नकली रुद्राक्ष मिळतात त्यावर जर आपण हा उपाय केलात तर त्या उपायाचा कोणताही परिणाम आपल्याला दिसून येणार नाही.
याठिकाणी आपल्याला 1 मुखी रुद्राक्ष घ्यायाचा आहे. आणि आपल्या छा’तीजवळ येईल इतका दोरा घेऊन हा रुद्राक्ष स्वतःच्या गळ्यामध्ये धारण करायचा आहे. जर तुम्ही रुद्राक्ष धारण करत असाल तर कोणत्याही प्रकारचे मांसाहार पदार्थ ग्रहण करू नका. रुद्राक्ष धारण केल्यामुळे कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती किंवा करणी बाधा असो त्याचा कोणताही प्रभाव तुमच्यावर पडणार नाही.
तर या दोन उपयांपैकी कोणताही एक उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला याचे चमत्कार दिसू लागलीत. यामुळे तुमच्या शारीरिक वेगळ्याच प्रकारचे चैतन्य निर्माण होईल. जर तुमच्या मनामध्ये कसल्या प्रकारची भीती असेल तर ती भीती सुद्धा या उपायामुळे निघून जाईल. उपाय अत्यंत प्रभावी आहे नक्की करून पहा.