नमस्कार मित्रांनो,
आयुष्यात यशस्वी आणि धनवान होण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. पण मेष राशी वाल्यांचा विषय थोडा वेगळाच आहे. या राशीच्या लोकांना जीवनात सफल व्हायचं असेल तर नक्की काय करायचं आहे आणि कुठल्या गोष्टीपासून सावध राहिले पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुमची कम जोर बाजू कोणती आहे, तुमची कोणत्या गोष्टीत मास्टर आहेत या सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत.
ज्योतिष शास्त्रानुसार, या राशीचे लोक बाकी राशीच्या लोकांपेक्षा वेगळं असतात. कारण त्यांना स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायला खूप आवडते. त्यांची गोष्टच काही और असते. मेष राशी हि मंगळाची राशी असून त्या राशीचे मालिक मंगल आहेत. तस पाहायला गेले तर मेष राशीचे लोक खूप बुद्धिमान असतात, पण कधी कधी काही गोष्टी अश्या असतात ज्यामुळे यांना जीवनात पुढे जाताना अडथळे निर्माण होतात.
मेष राशी असलेले काही लोक कामात खूपच आळस, बेजवाबदारीने वागतात. त्यामुळे हाती आलेली सुवर्णसंधी देखील ते सहज गमावून बसतात आणि म्हणून प्रगती होत नाही. मेष राशी वाल्यांनो एक गोष्ट एका, तुम्ही कधीच धनाची पर्वा करत नाही, आणि धन कमावले तरी बचत करण्याचे कष्टही घेत नाही. मान्य आहे तुमचा तो स्वाभाविक गुण आहे, पण तो बदलला जाऊ शकत नाही का. मनुष्यच असा एकमेव जीव आहे तो आपले आयुष्य आपल्या हिशोबाने स्वतःवर कंट्रोल करू शकतो.
सर्वच नाही पण बऱ्यापैकी मेष लोक नशेचे शिकार झालेले असतात. कामामध्ये पण कंटाळा करतात. उद्या करूया, नंतर करूया. यातच यांच्या जवळ खूप जवळचा असा कोणीच मित्र किंवा साथीदार नसतो. त्यामुळे बऱ्याच वेळा मेष राशी वाले आपल्याच घरच्या व्यक्तींपासून त्रस्त असतात. अशा वेळी तुम्हाला स्वतःवर भरोसा ठेवून जीवनात पुढे जाता आलं पाहिजे. यासाठी कर्मप्रधान होणे जरुरी आहे.
कामात आळशीपणा, ना कोणी जवळचा मित्र किंवा ना कोणी साथीदार. असे का घडते या राशींसोबत. तर तुमच्या कुंडलीत असलेला शुक्र. यामागे तुमचा शुक्र कारणीभूत आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार, तुम्हाला यशस्वी व्हावं वाटत असेल, स्वतःच्या कम जोरीवर विजय मिळवायचा असेल, त्यासाठी सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्यायची आहे, आठवड्यातून एक दिवस उपवास करायचा आहे.
उपवास कोणत्याही दिवशी तुमच्या सोयीनुसार पकडू शकता. पैसा येत नाही किंवा आलेला पैसा बचत होत नसल्यास सकाळी लवकर उठून स्नान करून कपाळी केशराचा गंद लावायचा आहे. एका वाटीत थोडे केसर घेऊन त्यात एक दोन थेंब गंगाजल टाकायचे आहे. गंगाजल नसेल तर नळाचे ताजे पाणी सुद्धा चालेल.
ते घेऊन मिक्स करून त्याचा गंद लावायचा आहे. उरलेले केसर फेकून देऊ नका. सुकलेल्या केसर मध्ये पुन्हा पाणी टाकून ते वापरू शकता. असं करा, काही दिवसातच जीवनात सका रात्मक बदल झालेले जाणवतील. हा उपाय आयुष्यभर करू शकता. शक्य असेल तर गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचे काहीही दान करा.
पिवळी केळी किंवा चण्याची डाळ इत्यादी, दोन चार केली घेऊन एखाद्या गरजवंतांना देऊ शकता. जवळच्या मंदिरात देऊ शकता. जरुरी नाही एक डजन केळीच द्यायची आहेत. तुमच्या इच्छेप्रमाणे देऊ शकता. लक्षात ठेवा गुरुवारीच हे कार्य तुम्हाला करायचं आहे. कर्जामुळे टेन्शनमध्ये असाल तर सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल अर्पित करा.
घरीच शिवलिंग असेल तर घरच्या घरी करू शकता किंवा जवळच्या मंदिरात जाऊन करू शकता. सफेद रुमालात मुठ्ठी भर अक्खे तांदूळ बांधून देव्हाऱ्यात ठेवा. कर्जातून मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. नंतर ते तांदूळ वाहत्या पाण्यात सोडू शकता.