कोणाच्या घरी मुलगी जन्म घेते? यावर स्वामींनी दिलेले सुंदर उत्तर नक्की बघा..

नमस्कार मित्रांनो, असे म्हटले जाते कि मुलगी झाली अन लक्ष्मी आली. पहिली बेटी धनाची पेटी. भगवंत सुद्धा सर्वांच्या घरी मुली पाठवत नाहीत. जे नशीबवान असतात, मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत  मुलींना पाठवतात. ज्यांच्या सतत वाईट भावना असतात, ज्यांचे मन वाईट असते अशा लोकांच्या घरात भगवंत कधीच मुलगी पाठवत नाहीत.

ज्यांची दान करण्याची नीती असते अशाच व्यक्तीच्या घरी मुली जन्म घेतात व त्यामुळे त्यांना कन्यादानाचे भाग्य प्राप्त होते. एकदा स्वामी विवेकानंद वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला. शेतकऱ्या सोबत दोन मुली होत्या. त्यातील जी लहान होती तिला खांद्यावर बसवले होते आणि मोठीचा हात धरून डोंगर चढत होते.

स्वामी विवेकानंद त्या शेतऱ्याला म्हणाले बाबा कुठे चाललात? त्यावर त्या शेतकऱ्याने म्हटले कि मी देवी आईच्या दर्शनास जात आहे. त्यावर स्वामी म्हणाले कि तुम्हाला खांद्यावर जास्त भार झाला असेल.  एक काम करा तुम्ही तिला माझ्या खांद्यावर द्या. वर मंदिरा जवळ पोहोचलो कि मी तिला तुमच्या हवाली करेन. त्यावेळी त्या शेतकऱ्याने खूप सुंदर उत्तर दिले.

अहो स्वामी मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार नसते. उलट मुलगी जेव्हा वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा वडिलांचा भार हलका करीत असते. ज्या माणसाला मुलगी ओझे वाटते तो बाप असूच शकत नाही. एक मुलगा आपल्या आईवडिलांना दुःखात बघू शकतो पण मुलगी  कधीच नाही.

आई वडिलांना थोडे जरी दुःख झाले तर मुलीचे हृदय लगेच कासावीस होते. जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत ती बागडत असते. परंतु एकदा का ती लग्न करून सासरी गेली कि आपण तिची फक्त वेळोवेळी आठवण करत राहतो. वडील कामावरून थकून भागून घरी आले कि लगेच वडिलांच्या हातात पाण्याचा ग्लास देईल. वडिलांची विचारपूस करेल, काही हवे नको बघेल.

वडील थोडे जरी चिंतेत दिसले कि लगेच त्यामागचे कारण जाणून घेईल. औ षध पाणी वेळेवर करेल. म्हणून तर म्हणतात मुलगी म्हणजे वडिलांची आईच असते. ती अगदी आईसारखीच वडिलांची काळजी घेते. वेळप्रसंगी रागवेल तर कधी लाडात येऊन बोलेल. चूक असेल तर ती चूक दाखवून देईल.

सून कितीही चांगली असली तरी मुलीची जागा कधीच घेऊ शकत नाही. लग्न करून जरी मुलगी सासरी गेली तरी तिकडून 10 वेळा फोन करून वडिलांच्या गोळ्या औषधांची आठवण करून देईल. जर मुलीला खूप लांब दिले असेल आणि भेटणे शक्य नसेल तर ती आठवणीने व्याकुळ होते. अशी कोणतीच स्त्री नाही जिला आपल्या आईवडिलांची आणि माहेरची आठवण येत नाही.

मुलगी जर सण उत्सवाला माहेरी येणार नसेल तर आई आसपासचे कोणी तिच्या गावाला जाणार असेल तर आपल्या हाताने बनवलेले लाडू चिवडा इत्यादी वस्तू पॅ क करून त्या व्यक्तीकडे देते. जेव्हा तो व्यक्ती ती पिशवी घेऊन जातो आणि तिच्या हातात देतो तेव्हा त्या  मुलीच्या आनंदाचे शब्दात काय वर्णन करावे? तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतात. मुलीच्या हृदयात उपजतच प्रेम असते.

आपण लहान मुलाच्या हातात बाहुली दिली तर तो तिचे केस उपटेल, हात पाय तोडील, कपडे फाडील परंतु तीच बाहुली जर आपण एखाद्या लहान मुलीच्या हातात दिली तर ती त्या बाहुलीला कपडे नेसवेल, तिचा मेकअप करेल आणि थोपटून झोपावेल.

यावरून तुम्हाला पटले असेल कि मुलींमध्ये उपजतच माया असते. आपण म्हणतो मुलीच्या सासरी जायच्या क्षणी सर्वात जास्त आई रडते परंतु शिवमहापुराणात दिले आहे कि ज्यावेळी देवी पार्वतीची लग्नानंतर पाठवणी झाली तेव्हा सर्वात जास्त हिमालय राज रडले होते.

मित्रांनो वडील असेल सर्वांसमोर रडत नाहीत. ते गपचूप घराच्या एखाद्या कोपऱ्यात बसून रडत असतात कारण ते मुलीला सासरी जाताना पाहू शकत नाहीत. आई  मुलीच्या गळ्यात पडून रडते परंतु वडील असे करत नाहीत. ते आतल्या आत रडत असतात.

मुली फक्त प्रेमाच्या भुकेल्या असतात. त्यांना प्रॉ प र्टी मधून काही नको असते. त्यांना फक्त माहेरी आल्या नंतर प्रेम, माया व दोन गोड शब्दांचीच अपेक्षा असते. जितके सुख मुलाकडून मिळत नाही तितके सुख मुलीचे फक्त तोंड बघूनच मिळते. अशा आया मुली ज्यांची देण्याची नीती असते जे मोठ्या मनाचे व नशीबवान असतात असाच व्यक्तींच्या घरी जन्म घेतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *