नमस्कार मित्रांनो,
इतिहासात कामाख्या मंदिर हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे आणि नैसर्गिकरित्या, शतकानुशतके इतिहासाशी सं-बंधित आहे. हिंदू धर्मात, आसाममधील हे एकमेव असे मंदिर आहे जेथे स्त्रियाना त्याच्या अडचणीच्या काळात या मंदिरात प्रवेश मिळतो . कामाख्या शक्तीपीठ असे या मंदिराचे नाव आहे. भगवान विष्णूनी आपल्या सुदर्शन चक्राने माता सतीचा नाश केला होता.
त्यावेळी सती देवीचा योनी भाग कामाख्यामध्ये पडला होता. हिंदू धर्म आणि पुराणानुसार जिथे सती किंवा अंग घातलेले कपडे व दागिने जिथे पडले तेथे शक्तीपीठ म्हणून अस्तित्त्वात आले. या मंदिरात सतीची पूजा यो-नीच्या रूपात केली जाते. कामाख्या मंदिर शक्तीपीठ हे 51 शक्तीपीठांपैकी मानले जाते. कामाख्या देवीचे मंदिर म्हणजे अघोरि आणि तांत्रिकांचा बालेकिल्ला मानला जातो.
हे मंदिर सर्व शक्तीपीठांचे महापीठ मानले जाते. ध र्म पुराणांनुसार या ठिकाणी भगवान शंकराचे माता सतीच्या प्रति असलेल्या मोहाचा भंग करण्यासाठी, भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने देवीचे 51 भाग केले होते व ज्या ज्या ठिकाणी हे 51 भाग पडले. या ठिकाणी मातेची यो-नीचा भाग पडला होता, जे आता 1 शक्तिशाली पीठ आहे. कामाख्या देवीची मा सि क पा ळी महिन्यातुन 3 दिवस होते.
मग तीन दिवसानंतर भाविकाची येथे दर्शनासाठी गर्दी होते. या मंदिरात लाल रंगाचे ओले कापड भेट दिले जाते. जेव्हा 3 दिवस आईला पाळी होते तेव्हा मंदिराच्या आत पांढर्या रंगाचे कापड पसरतात . तीन दिवसानंतर ही मातेच्या पाळीमुळे ती वस्त्रे लाल रंगाने भिजलेली असतात.या मंदिराची काही वेगळी वैशिष्ट्य सांगितले जातात. त्यामुळे येथे कन्या आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीची पूजा करतात.
त्याच बरोबर येथे प्राण्यांचे बळी देखील दिले जातात. पण येथे मादी प्राण्याचा बळी दिला जात नाही. तसेच काली आणि त्रिपुरा सुंदरी यानंतर कामाख्या माता ही तांत्रिकांची सर्वात महत्वाची देवी मानली जाते. या देवीची पूजा महादेवाची नवीन वधू म्हणून केली जाते. तसेच या मंदिरच्या परिसरामध्ये भक्त इच्छा घेऊन येतात देवी त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. या मंदिरा जवळच्या मंदिरात या आईची मूर्ती मिळेल.त्याला कामदेव मंदिर म्हणतात.
या मंदिरात तांत्रिक दृष्ट शक्तींवर देखील विजय मिळवता येतो .कामाख्याचे तांत्रिक व साधू चमत्कार करण्यास खुप सक्षम मानले जातात.आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक कामाख्याच्या तीर्थयात्रेवर येतात. कामाख्या मंदिर तीन भागात बनलेले आहे. पहिला भाग सर्वात मोठा आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीला प्रवेश नाही, तर दुसर्या भागात आईचे दर्शन होते जिथे महिन्यातील तीन दिवस मातेला मा सि क पाळी येते यादरम्यान मंदिराचे दरवाजे तीन दिवस बंद ठेवतात.
मग तीन दिवसांनी मंदिराचे दरवाजे मोठ्या थाटामाटाने पुन्हा उघडतात. हे ठिकाण तंत्र साधनेसाठी सर्वात महत्वाचे स्थान मानले जाते. येथे संन्यासी आणि अघोरी यांची गर्दी कायम असते. जर एखाद्या व्यक्तीला काळ्या जादूचा खुप त्रास होत असेल तर तो दर्शनासाठी येथे येतो. त्यामुळे हे देशातील काही हिंदू मंदिरांपैकी एक आहे, जिथे अजूनही प्राण्यांचा बळी दिला जातो.
या मंदिराशेजारी एक तलाव असून तेथे पाच दिवस दुर्गामातेची पूजाही केली जाते आणि येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिरात कामाख्या मातेला शेळ्या, कासव आणि म्हशी अर्पण केल्या जातात आणि काही लोक कामाख्या देवीच्या मंदिरात कबुतर, मासे आणि ऊस देखील अर्पण करतात. त्याच वेळी, असे देखील सांगितले जाते की प्राचीन काळी येथे मानवी बाळांनाही बळी दिले जात होते, परंतु कालांतराने ही प्रथा बदलली आहे. आता इथे प्राण्यांच्या कानाच्या कातडीचा काही भाग बळीचे प्रतीक म्हणून दिला जातो.
एवढेच नाही तर हे प्राणी तिथेच सोडले जातात. माता कामाख्याचे पवित्र निवासस्थान तंत्र-मंत्राच्या अभ्यासासाठी ओळखले जाते. या सिद्धपीठावर प्रत्येक मनोकामना पूर्ण होते असे सांगितले जाते. म्हणूनच या मंदिराला कामाख्या म्हणतात. येथे साधू-अघोरींची वर्दळ असते. मंदिरात ठिकठिकाणी तंत्र-मंत्राशी सं-बंधित गोष्टी पाहायला मिळतील. अघोरी आणि तंत्र-मंत्र करणारे लोक येथून या गोष्टी घेतात.