जी महिला उशीखाली ही 1 वस्तू ठेऊन झोपते तिला मिळतो महालक्ष्मीचा आशीर्वाद..सर्व काही मिळते..

नमस्कार मित्रांनो,

आपल्या जीवनात अनेक अडचणी, अडथळे येतात. कितीही झालं तरी काही वेळेस चूक नसताना आपल्याला खूप त्रास होतो, घरात अनेक समस्या असतात, अनेक त्रासदायक घटना घडतात त्यामळे घरातील लक्ष्मी निघून जाते व अलक्ष्मी वास करते. अनेक अशा गोष्टी घडतात ज्यामुळे जीवनात अशांतता निर्माण होते.

आपल्या कुंडलीतील काही ग्रह दोष हे आपल्या जीवनावर वाईट परिणाम करत असतात. त्यामुळे आपल्याला खूप त्रा स होतो. अशा वेळी हे दोष दूर करण्यासाठी काही ज्योतिषी उपाय असतात. त्यामुळे या ग्रहस्थिती मध्ये फरक पडू शकतो. त्यामुळे तुम्ही हे छोटे उपाय करून बघा.

याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.जर आपण हा एक उपाय करून पाहिला तर तुमचे सर्व कष्ट, अडचणी, दुःख दूर होऊ शकतात.हा उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता. माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देईल.

या उपायासाठी लागणारी वस्तू आपल्या घरातच आहे. तिचा वापर योग्यप्रकारे केल्यास भरपूर लाभ होऊ शकतो. झोप जर नीट झाली तर सर्व काही ठीक होते, शरीर, मन प्रसन्न राहते. तसेच ही वस्तू म्हणजे तुम्ही रात्री झोपताना उशाखाली जी उशी घेता ती उशी होय.

झोप शांत लागावी, पूर्ण व्हावी म्हणून अनेक लोक अनेक उपाय करतात. आपल्या धर्मशास्त्र अनेक असे उपाय आहेत जे केल्याने आपल्याला छान झोप लागते. आपल्या घरातील, अंगणातील तुळशीला शास्त्रात खूप महत्व आहे, तुलसी माता साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते.

लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी तुळशी मातेची रोज सकाळी लवकर उठून पूजा केल्यास अनेक लाभ होतात. इतकेच नव्हे तर तुमच्या आयुष्यातील अनेक दुर्भागी गोष्टी सदभाग्यात बदलण्यासाठी याची मदत होते. हीच तुळशीची पाने आपण जर झोपताना उशीखाली ठेवली तर शांत झोप लागते, तसेच वाईट स्वप्न पडत नाहीत व झोपेत, स्वप्नात दचकून उठत नाही.

तुळशीच्या पानांचा हा एक प्रभावी उपाय आहे. हा उपाय सलग 21 दिवस केला तर तुमच्या कामातील अडचण दूर होते. ही तुळशीची पाने रात्री उशीखाली ठेवल्याने आपल्यात सकारात्मकता निर्माण होते. आणि नंतर ही पाने सकाळी उठून कोणत्याही झाडाखाली किंवा कुंडीत ठेवा. असे तुम्हाला रोज करायचे आहे.

खूपच अडचणी येत असतील, डोक्यात सतत वाईट विचार येत असतील तर रोज रात्री उशीखाली मोरपीस ठेवा व सकाळी उठून त्याचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करा. त्याचे दर्शन म्हणजे साक्षात श्री विष्णूचे दर्शन व आशीर्वाद आहे.

इतकेच नव्हे तर तुमच्या जीवनात भरपूर नैराश्य असेल, भरपूर समस्या असतील घरात सतत अशुभ घडत असेल तर तुम्ही घरातील धार्मिक ग्रंथ, पोथी यामध्ये सकारात्मक ऊर्जा ही असते. ती आपण आपल्या भोवताली ठेवायचे आहे व या उपायामुळे तुमच्या स म स्या दूर होतात..

त्यासाठी तुम्हाला एका लाल कपड्यात बांधून ते गाठोडे रोज रात्री झोपताना जवळ ठेवायचे व उठल्यावर त्याला नमस्कार करत चला. असे केल्याने तुमच्यात सकारात्मक ऊर्जेचा वास होईल व समस्यांचे समाधान होऊन परिस्थिती सुधारेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *