नमस्कार मित्रांनो,
असे मानले जाते की आपल्या हाताच्या रेषांवर आपले भाग्य अवलंबून असते. जर तुमच्या तळहातावर अर्धचंद्र बनत असेल तर याचे काय रहस्य आहे हे आज आपण पहाणार आहोत. हातावरील रेषा कायम आपल्याला उत्साहित करत असतात. प्रत्येक जणांना जाणून घेण्याची इच्छा असते की त्यांच्या हातावरील रेषा भूत, भविष्य, वर्तमाना बाबत काय सांगतात.
यात जोतिशी हातावरील रेषा पाहतात. काही जोतिष पायावरील आणि कपाळावरील ही रेषा पाहतात. हस्त रेषा तुमच्या आरोग्य आणि इतर गोष्टींबाबत माहिती देतात. इतकेच नाही तर तुमच्या जीवनात होणाऱ्या चांगल्या वाईट घटनांबद्दलही या हस्त रेषा सांगतात. तुम्ही ही कायम हातावर बनणाऱ्या अर्धचंद्रा बाबत उत्सुक असाल. तर चला तळहातावरील चंद्राचा काय अर्थ होतो ते जाणून घेऊयात.
तुमच्या दोन्ही तळहातांना जवळ आणा त्यानंतर सर्वात वर असणारी डावा व उजव्या हाताची रेषा एकमेकांना जुळवा त्यातून जो आकार बनेल तो अर्धचंद्र असतो. ज्यांचा हातावर अर्धचंद्र झाला त्यांना कलकलाट नाही तर शांतता आवडते. ज्यांच्या हातावर अर्धचंद्र बनतो त्या व्यक्ती खूप सुंदर आणि ऍक्टिव्ह स्वभावाच्या असतात.
आशा प्रकारचे लोक आपली मैत्री कायम ठेवतात आणि आपल्या मित्र-मैत्रिणींशी खूप इमानदार असतात. आशा व्यक्तींची बुद्धी खूप चाणाक्ष असते व त्यांच्यात प्रत्येक गोष्ट आठवण्याची क्षमता अधिक असते. आशा व्यक्ती आपले प्रेम मिळवण्यासाठी तडफड करतात.
आपल्या मनातल्या गोष्टी मनातच ठेवतात आणि स्वतःहून कुणाशी बोलत नाहीत. त्याशिवाय कोणतेही संकट आले तर घाबरून न जाता त्या संकटांचा सामना करतात. आशा व्यक्ती आपल्या जीवनसाथी बद्दल खूप भावून असतात.
जर अर्धचंद्र न जुळल्यास व हातावर सरळ रेष बनत असेल. तर ती व्यक्ती खूप शांत व दयाळू स्वभावाची असते. यांना प्रत्येक काम शांततेने व आरामात करायला आवडते. असे मानले जाते की हातावर सरळ रेषा असणाऱ्या व्यक्ती खूपच कमी असतात.
जर दोन्ही हात जुळवले असता एक रेषा खाली आणि एक रेषा वरी राहत असेल किंवा वाकडी तिकडी दिसत असेल. तर आशा व्यक्तींना आपल्या वया पेक्षा मोठया असलेल्या व्यक्तींबरोबर राहायला आवडते. आशा व्यक्ती इतरांचा व समाजाचा काहीही विचार करत नाहीत. यांना लोक काय मनतील किंवा आपल्या बद्दल काय विचार करतील याबद्दल काहीही वाटत नाही.