Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

चप्पल खाली ठेवा ही वस्तू…रात्रंदिवस शत्रू तडपेल..! शत्रूचा टोटल नाश..

एखादी व्यक्ती जर तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर अशा व्यक्तीचा बिमोड करण्यासाठी या टोटक्याचा वापर आपण आवर्जून करा. समोरची व्यक्ती ज्या शक्तीच्या जोरावर तुम्हाला त्रास देते आहे ती शक्ती त्याच्यापासून हिरवली जाईल. केवळ एका दिवसात हा टोटका त्याचा परिणाम दाखवू लागतो. ज्या व्यक्तीवर तुम्ही हा टोटका कराल त्या व्यक्तीला नरकयातना भोगाव्या लागतात.

रात्रंदिवस त्याच्यासमोर एका मागोमाग एक अडचणी उभ्या राहतात. या अडचणींच्या चक्रामध्ये तो असा काही गुंतला जातो की तुम्हाला त्रास देणे तर सोडा तर तुमचा विचार सुद्धा तो करणार नाही. तुमचं वाईट करू इच्छिणाऱ्या, तुमचं अहीत करू इच्छिणाऱ्या लोकांवरच कृपया तुम्ही हा टोटका आजमावयचा आहे. कोणत्याही निष्पाप व्यक्तीला, कोणत्याही गरीब माणसाला त्रास देण्यासाठी कृपया या टोटक्याचा वापर आपण करू नका.

अन्यथा हा टोटका आपल्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही याचीही खात्री बाळगा. अत्यंत शक्तिशाली आणि ताकदवर असा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणताही मंत्र बोलण्याची गरज नाही. तंत्र विद्येतील फक्त दोन शब्द आपण बोलायचे आहेत आणि आपल्या चप्पलचा या ठिकाणी वापर करायचा आहे. मित्रांनो हा उपाय कसा केला जातो. आपल्या शत्रूचे वाईट दिवस कशाप्रकारे सुरू होतात अगदी संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

हा उपाय कोणत्याही दिवशी आठवड्यातील कोणत्याही दिवशी कोणत्याही अवस्थेमध्ये तुम्ही करू शकता. यासाठी स्नानच करायला हवं, शुद्धीकरण महत्त्वाचं यासारख्या कोणत्याही नियमांचे पालन करायचं नाहीये. आठवड्यातील कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी अगदी मध्यरात्री केला तरीही चालेल. दुपारी भर उन्हात केला तरीही चालेल. या दोन वेळा अशा प्रकारचे शत्रू नाशाचे टोटके करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.

किंवा अगदी वेळ नसेल सकाळ संध्याकाळ कधीही करा. उपाय कसा करायचा अगदी लक्षपूर्वक वाचा. हा उपाय करण्यासाठी तुम्ही जी चप्पल वापरता जी सॅंडल वापरतात त्याचा वापर आपण करणार आहोत. या ठिकाणी बुटांचा म्हणजे शूज चा वापर हा करायचा नाहीये हे कृपया लक्षात ठेवा. तर आपण आपली चप्पल किंवा सॅंडल घ्यायची आहे. डाव्या पायामध्ये आपण जी चप्पल परिधान करतो ही चप्पल आपण घ्यायची आणि या चप्पल च्या खालच्या बाजूला चप्पल पालथी करा.

या चप्पलच्या तळाशी या चप्पलच्या खालच्या बाजूला आपण काजळाच्या मदतीने किंवा काळया पेनाच्या मदतीने किंवा पेन्सिल घ्या. काळया रंगाची कोणताही वापर तुम्ही करू शकता. तर काजळाने किंवा काळया रंगाच्या शाईने आपण या चपलेच्या खालच्या बाजूला दोन शब्द लिहायचे आहेत. तत-नाश हे दोन शब्द लिहायचे आहे. दोन शब्दांच्या मध्ये डॅश आपण मारायचा आहे. त्याच्या खाली दोन संख्या सांगतो आहे, दोन नंबर्स आहेत. ७७७-६७६ हा नंबर लिहायचा आहे. मराठीत लिहा, हिंदीमध्ये लिहा उर्दूमध्ये तुम्हाला तुमची जी भाषा आहे त्या भाषेत लिहू शकता.

आणि त्याच्या खाली तुमच्या शत्रूचं नाव तुम्ही लिहायच आहे. या ठिकाणी बरेच लोक जी चूक करतात ते सांगतो तुमच्या शत्रूला आजूबाजूचे लोक ज्या नावाने हाक मारतात, समाज ज्या नावाने त्याला हाक मारतो असं प्रचलित असणार आपल्या शत्रूच नाव आपण खाली लिहायचं आहे. लिहिल्यानंतर तीन गोष्टी आपण लिहिल्या तत-नाश, ७७७-६७६ आणि खाली शत्रूचं नाव अशा प्रकारे काळया शाईने किंवा काजळाने हे सर्व सामग्री लिहिल्याच्या नंतर आपण ही चप्पल आपल्या डाव्या हातात घ्यायची आहे

आणि या नावाकडे पहायचय शत्रूच्या नावाकडे पहायचय आणि तीन वेळा मी जे बोलतो आहे त्याचे उच्चारण करायचे शत्रूचं नाव घ्या. समजा शत्रूचं नाव अमुक असं आहे. तर शत्रूचं नाव घ्या अमुक आणि नंतर म्हणा ततनाश. अमुक ततनाश, अमुक ततनाश, अमुक ततनाश असं तीन वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर ही चप्पल आपल्याच पायामध्ये, डाव्या पायामध्ये आपण घालायची आणि जितक्या जोराने तुम्हालाही चप्पल जमिनीवर रगडता येईल तितक्या जोरात ही चप्पल रगडायची आहे.

खालचं नाव पुसेल, खराब होईल याची काळजी करू नका ते खराबच करायच आहे. पूर्ण तुमचा द्वेष, तुमचा राग तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल मनामध्ये जितकी वाईट तुम्हाला वाटत आहे, त्या व्यक्तीने तुमच्यावर जितका अन्याय केलेला आहे तो संपूर्ण राग चपलेवर आपण काढायचा आहे. जमिनीवर रगडायचे आहे आणि रगडल्यानंतर पुन्हा एकदा ती पालथी घालून जिथे रगडली त्याच ठिकाणी पालथी घाला आणि तुम्ही तुमचं बाकीचं काम करू शकता.

ही चप्पल त्याच ठिकाणी आपण ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, दुसऱ्या दिवसापासून आपण या चपलीचा वापर करायला सुरुवात करायची. लक्षात ठेवा, सर्वात प्रथम डाव्या पायातली चप्पल परिधान करा आणि त्यानंतर उजव्या पायातली आणि त्यानंतर आपण ही चप्पल वापरायची जसजसे तुम्ही ही चप्पल वापराल, ती जसजशी घासेल,

त्यावरती प्रेशर पडेल, दबाव पडेल, ती रगडेल तुमच्या शत्रूच्या जीवनात तितक्याच जास्त यातना, तितके जास्त प्रॉब्लेम्स आणि समस्या निर्माण होतील यामध्ये शंका नाही. शत्रू नरक यातना भोगू लागेल. मित्रांनो, अत्यंत प्रभावशाली, शत्रू पिडा, शत्रू बाधा यांच्यापासून मुक्ती प्रदान करणारा हा उपाय आहे. विनंती आहे, कृपया याचा दुरुपयोग चुकूनही करू नका. धन्यवाद.