नमस्कार मित्रांनो,
अनेक लोकांना आपलं सुख पाहवत नाही, असे लोक असतात जे सतत आपल्यावर जळत राहतात आणि त्यांची वाईट नजर ही आपल्या घरामध्ये पडत असते. अनेकवेळा आपल्या हातून आपल्या तोंडून कोणाचातरी अपमान घडतो आणि त्या व्यक्तीचे शिव्याशाप, तळतळाट हे आपल्याला लागतात. मग अशा वेळी घरामध्ये तो पैसा येत असतो तो पैसा कमी होऊ लागतो.
लक्ष्मी अशा घरातून हळूहळू निघून जाते आणि अशा घराची प्रगती खुंटते. घरामध्ये सतत कुरकुर होऊ लागतात. यावर उपाय म्हणजे, सर्वात प्रथम आपण कुणाचाही अपमान करू नका आणि कोणाला अपशब्द बोलून किंवा एखाद्याचं मन दुखावेल अशा प्रकारे त्याचा अपमान करणे या गोष्टी करणं सोडून द्या.
दुसरी गोष्ट तुमचं सुख, तुमचा पैसा किंवा तुमचा आनंद हा इतरांना दाखवत बसू नका, कारण जेव्हा नजर लागते तेव्हा ती अत्यंत वाईट असू शकते आणि ही नजर प्रगतीपथावर असणार या घरांना सुद्धा अधोगतीकडे घेऊन जाऊ शकते. ज्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर घरातील लोकांना अस्वस्थ वाटतं, तुम्ही बाहेर गेलात खूप चांगलं वाटतं मात्र घरामध्ये आलं की एक प्रकारची अस्वस्थता जाणवू लागते.
तर अशा वेळी त्या घरांमध्ये काहीना काहीतरी दोष असू शकतात. कधीकधी वास्तु दोष असतात. कारण जर तुमचे किचन जर आग्नेयीकडे नसून इतर दिशांना असेल तरीही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते किवव तुमचं टॉयलेट बाथरूम वगैरे वास्तुशास्त्राप्रमाणे असावे लागतात. एक ना अनेक प्रकारच्या समस्या किंवा दोष असू शकतात. ह्या सर्वांवरती एक अत्यंत जोरदार शास्त्र अशा प्रकारचा उपाय सांगितलं जातो.
तर 28 जून या दिवशी मंगळवार आहे आणि ज्येष्ठ अमावस्या दिवशी आलेली आहे. तरी अमावस्येच्या दिवशी आपण हा एक छोटासा उपाय आपल्या घरामध्ये नक्की करून पहा, हा उपाय घरात सुद्धा करता येतो. हा उपाय करण्यासाठी सर्वोत्तम वेळ ही सूर्यास्तानंतर आहे म्हणजे म्हणजे सूर्य मावळल्यानंतर होय.
सूर्य मावळल्या बरोबर हा उपाय केल्यास खूप छान अन्यथा पण संपूर्ण रात्रभर हा उपाय करून उपाय करू शकता. बुधवारी सकाळी या अमावस्या समाप्त होत असल्यामुळे, थोडक्यात मंगळवारी संपूर्ण दिवसभरामध्ये हा उपाय करण्यास हरकत नाही. परंतु सूर्यास्तानंतरची वेळ ही सर्वोत्तम आहे. आता उपाय करण्यासाठी थोडीशी सामग्री लागते, त्यामध्ये थोडीशी गडद रंगाचे मोहरी अर्धा किंवा एक चमचा घ्यायची आहे.
मग त्यानंतर थोडासा कापूर घ्यायचा आहे. हा कापूर जर भीमसेनी असेल अतिउत्तम आहे नसेल तर तुम्ही देवघरात ठेवलेल्या कापूर वापर करू शकता. सोबत थोडीशी काळीमिरी घ्यायचे ते कुठून घ्यायची आहे आणि या वस्तू आपण एकत्र करा आणि त्यामध्ये त्याची छोटीशी गोळी बनवायचे आहे. तसेच ही गोळी बनवण्यासाठी तुपाचा वापर करावा. मग त्यानंतर ती बनवलेली गोळी आपण जाळायची आहे.
आता जाळण्यापूर्वी तुमच्या देवी-देवता श्रद्धा असेल किंवा तुम्हाला तो मंत्र व्यवस्थित येतो त्या मंत्राचा जप करा किंवा गुरुदेव दत्त स्मरण केलं तर अतिशय उत्तम राहील. यामुळे घरामध्ये जिथे हाय लागलेली आहे नजर आहे किंवा कुणीही केलेला आहे बाधा आहे हे सर्व गोष्टीतून जर मुक्त असेल तर गुरु देव दत्तांचा स्मरण आपण त्या ठिकाणी करावे.
ही गोळी एखाद्या वाटीमध्ये घ्या आणि ती गोळी वाटीमध्ये ठेवा आणि जाळा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते भाजनार नाही आणि या गोळीचा जो दूर आहे तो संपूर्ण घरामध्ये आपण फिरवायचा आहे. हा दूर अगदी बाथरूम असेल, विशेष करून ज्या ठिकाणी अंधारलेल्या जागा आहेत अंधारलेली कोपरे आहेत ते जास्त उजेड पडत नाही अशा कोपऱ्यांमध्ये हमखास आपण हात दूर फिरवायचा आहे. हा उपाय सलग 2-3 दिवस केल्यास तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर होण्यास सुरुवात होईल.