Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

या वेलीचा एक तुकडा जवळ ठेवा, साक्षात लक्ष्मी-कुबेर घरात वास करतात, सर्व मार्गांनी घरात धन, ऐश्वर्य येते..

आज आपण असा एक उपाय बघणार आहोत की ज्या उपायामुळे आपले सर्व मनोकामना पूर्ण होतील. यासाठी आपल्याला फक्त एक वेलीचा तुकडा आपल्या जवळ ठेवायचा आहे आणि हा वेलीचा तुकडा कशा रीतीने आपली मदत करतो ते स्वतः तुम्ही अनुभवाल. फक्त हा तुकडा जवळ ठेवायचा आणि काहीच करायचे नाही असे नाही.

प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही जीवनात प्रत्येक गोष्टीचे अर्जन करावे लागते मग ते ज्ञान असो या पैसे ते मिळवण्यासाठी कर्म महत्त्वाचे असते. पण प्रत्येक वेळेला असे होते की एखाद्या गोष्टीसाठी आपण लाख प्रयत्न करतो परंतु आपल्याला सफलता मिळत नाही. कारण आपले प्रयत्न 100% खरे असतात पण भाग्य कमजोर असते.

या निसर्गामधील अशी कोणती ना कोणती गोष्ट असते जी आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आपला साथ देत नाहीत. पण काही अश्या वस्तू असतात ज्या घरात ठेऊ शकतो. उदा. हाथ जोडी, सियार सिंगी, मांजरीची नाळ इत्यादी. या वस्तू घरात ठेवल्याने आपण जो प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना शक्ती मिळते व त्यामुळे आपले जे भाग्यबल असते ते तिव्र गतीने काम करायला लागते.

समजा आपल्याला १० किलोमीटर लांब एखाद्या स्थळी जायचे आहे आणि आपण त्या ठिकाणी चालत जात आहात तर आपल्याला त्या स्थळी पोहचायला वेळ लागणार आहे. पण जर आपल्याला तिथे जाण्यासाठी एखादी गाडी मिळाळी तर आपण त्या ठिकाणी लवकर पोहचाल. याचप्रमाणे तंत्र मंत्र या आशा काही गोष्टी आहेत जे आपले भाग्य मजबूत होण्यासाठी मदत करतात तर जाणून घेऊया आजच्या उपायाविषयी.

या उपायासाठी जी वस्तू लागणार आहे ती आहे एका वेलीचा तुकडा.आपण पाहिले असेल की पावसाळ्यात वृक्षाच्या अवतीभोवती काही वेली उगवतात. आपल्याला शुल्क पक्षाच्या अष्टमीच्या दिवशी आपल्या हाताच्या बोटाच्या जाडीचा तीन इंच लांबीचा एक वेलीचा तुकडा घ्यायचा आहे. पण हा वेलीचा तुकडा आपल्याला जे वेल वडाच्या झाडाखाली उगवले असेल अश्या वेलीचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे.

अश्या झाडाच्या खाली आपल्याला अष्टमीच्या पहिल्या दिवशी जायचं आहे म्हणजे सप्तमीच्या दिवशी जायचे आहे आणि जाताना थोडे पिवळे तांदूळ म्हणजे हळदीने रंगवलेले तांदूळ घेऊन जायचे आहे व हे तांदूळ त्या वडाच्या झाडाला आपण अर्पित कराचे आहेत. व त्या वेलेला व झाडाला प्रार्थना करायची आहे व आमंत्रण द्यायचे की अष्टमीच्या दिवशी मी आपल्याला नेण्यासाठी येत आहे तरी कृपा करून तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी या असे म्हणून नमस्कार करायचे आहे.

आणि अष्टमीच्या दिवशी वेलीचा तुकडा आणण्यासाठी जावे घरी आणल्यानंतर या तुकड्याला पिंपळाच्या पानाच्या रसामध्ये भिजत ठरवायचे आहे. वडाच्या झाडामध्ये शिव आणि पार्वतीचा वास असतो तर पिंपळाच्या झाडामध्ये विष्णूचा वास असतो आणि वडाच्या झाडावर आलेल्या वेलीत प्रगतीचा वास असतो त्यामुळे या सर्व शक्ती आपल्या घरामध्ये आणल्या पाहिजेत.

हा वेलीचा तुकडा आपण कमीत कमी 24 तास त्या पिंपळाच्या रसात भिजवत ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी हा तुकडा आपण त्या रसातून बाहेर काढायचा आहे व स्वच्छ करून घ्यायचा आहे. मग हा तुकडा आपल्या देवाऱ्यात किंवा एखाद्या पाटावर ठेवायचा आणि धूप दीप दाखवायचे आहे व पिवळे फुल वाहायचे आहे. ज्या प्रकारे आपण आपल्या देवाची पूजा करतो तशी याची आपण पूजा करायची.

आणि यानंतर वेलीचा तुकडा आपल्या पर्समध्ये ठेवावा किंवा आपल्या तिजोरीत ठेवावा. 7 दिवसाच्या आत जे काही आपले अडकलेले काम आहे ते पूर्ण होते. जसे आपल्याला नौकरीचे कॉल किंवा लेटर येणार असेल पण ते येत नाही आहे, लग्न ठरण्यात अडचणी येत आहे, आपले पैसे येणे आहेत पण येत नाहीत, आपला शत्रू आपल्याला त्रास देत आहे कसलेही काम असूद्या आपण ज्या मनोकामनेने हा तुकडा तुमच्या पर्स मध्ये किंवा तिजोरीत ठेवाल तुमचे ते काम पूर्ण होऊन जाईल.

जर हा तुकडा आपण धन प्राप्तीच्या उद्देशाने आणला असाल तर लक्षात ठेवा हा तुकडा बनून आपल्या जवळ ठेवल्यानंतर 7 दिवसाच्या आत तुमची भेट एखाद्या धनादिश संपन्न अश्या व्यक्तीशी होईल. आणि त्याच्या साह्याने आपली सर्व कामे पूर्ण होतील व चारीही दिशेने आपल्याकडे पैसे येऊ लागतील.आपण हा उपाय नक्की करून पहा या उपायाने आपली सर्व मनोरथ आवश्य पूर्ण होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *